Wednesday, December 17, 2008

अन्नावाचून मरताना….

"आम्ही गेले २५ वर्ष डॉक्टर कार्व्हर यांचे ऋणी आहोत.त्यानी भुइमुगापासून बनवलेल्या दुधान आमच्यावर अनंत उपकार केले आहेत.आफ्रिकेच्या अंतर्गत भागात त्से-त्से माश्या व हिंस्त्र श्वापद यांच्यामुळ दुभती जनावर पालता येत नसत…तेंव्हा मातेच स्तन्य मिळू न शकनाऱ्या नवजात बालकांच्या पोषणाचा यक्ष प्रश्न उभा ठाके…१९१८ साली आम्ही त्याना पत्र पाठवुन अड़चन सांगितली त्यानी भुइमुगापासून दूध कस तयार कराव याची कृति सांगितली..त्यामुले शेकडो बालके वाचू शकले त्यांचे आभार मानण्यासाठी आमच्याकडे शब्द अपुरे आहेत…”
५ जानेवारी १९४३ रोजी डॉक्टर कार्व्हर यांचा मृत्यु झाल्यानंतर त्यांच्याविषयी त्या देशातील नागारिकानी काढलेले हे उदगार आहेत…भुइमुगापासून दूध बनवून एक देश वाचवू शकनाऱ्या समोर खरच नतमस्तक व्हायला पाहिजे…१९४७ साली स्वातंत्र्य मिळालेल्या भारत या प्रगत देशात आजही अनेक बालके अन्नावाचुन किंवा चांगल खाण्यासाठी मिळत नाही म्हणुन कुपोषनाने बळी जातात …आमच्या देशात आजपर्यंत यावर उपाय सांगणारा एक ही नर जन्मला नाही याचे खरे दुखः आहे…रोज कूपोषणाच्या बातम्या ऐकून मन सुन्न होत…
भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कार्व्हरने पर्याय देवून त्या देशातील बालकाना जगवल आज आम्हाला स्वातंत्र्य मिळून ६१ वर्ष झाली तरीही आम्हाला कुपोषणावर उपाय सापडू नये यास काय म्हणायचे ?
प्रगत कोण?हा प्रश्न आजही आमच्या समोर आहे .
सलाम कार्व्हर …सलाम … !!!

No comments:

Post a Comment